अहेरी- जागृत युवा मंच व युवा विकास संस्था प्रेरित चाणक्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने नगर पंचायत अहेरी येथे स्मरणपत्र देऊन वाचनालयाची मागागी करण्यात आली. अहेरी उपविभागातील विद्यार्थ्यांनी गेल्या चार वर्षापासून वाचनालयाची मागणी रेटून धरण्यात आली होती परंतु ह्या मागणीकडे नगरपंचायतचे सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी व वाचन प्रेमी ह्यांनी नाराजी वर्तविली होती. स्मरण पत्रात म्हंटले आहे की, ७४ व्या घटना दुरुस्ती नुसार कलम २४३(ड) अन्वये नगर पंचायत व नगरपरिषद ह्यांचे कार्य दिले असून त्यात १३ वे कार्य हे सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करून देणे संदर्भात असल्यामुळं नगरपंचायतला कलम २४३ (ड) चा विसर पडलेला आहे. सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करून देण्याकडे नगरपंचायत चे सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे अहेरी उपविभागातील विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्मरण पत्र स्वीकारत नगराध्यक्षा यांनी येत्या पंधरा दिवसात वाचनालय उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले असून मागणी पूर्ण न झाल्यास स्व पुस्तकांसह नगरपंचायत च्या परिसरात उपोषण करू असा इशारा संघटनेने दिला आहे.
याप्रसंगी जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर, युवा विकास संस्थेचे अध्यक्ष रुपेश गावडे, चाणक्य अकादमी चे जुगल बोंमंवार, दीपक सूनटकर, सुधीर कोरेत, मोहन चांदेकर आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
ADIVASI GRAMIN SAHITYA BAHUDDESHIYA SANSKRUTIK SHIKSHAN MANDAL, CHANDRAPUR has been providing educational, social and cultural services to tribal dominated, Naxal affected, remote areas of Gadchiroli/Chandrapur district of Maharashtra state for many years. The aim of the organization is to develop leadership qualities, talent and spread education among the youth here.
बुधवार, २७ जून, २०१८
बुधवार, ६ जून, २०१८
● *जागृत युवा मंच तर्फे चेरपल्ली येथे शेतकऱ्यांना मोफत रेनकोट वाटप*
● *जागृत युवा मंच तर्फे चेरपल्ली येथे शेतकऱ्यांना मोफत रेनकोट वाटप*
● *जागृत युवा मंचा अहेरी च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले*.
*अहेरी :-* पावसाळी हंगामात शेतकरी बांधव पेरणी, धानकापणी करत असतात अशा वेळेस त्यांना पावसामुळे त्रास जाणवत असतो. शेतकरी वर्गाला शेती चे कार्य करत असताना पावसाळ्यात पाऊस पडतांना शेतकऱ्यांना पाण्यामध्ये भिजतच कार्य करावे लागते अशी माहिती प्राप्त होताच शहरातील जागृत युवा मंचाने पुढाकार घेऊन रेनकोड वाटण्याचे निर्धार करून त्यांचे अमूल्य योगदान बघता चेरपल्ली गावातील एकूण २८ शेतक-यांना रेनकोट वाटप करण्यात आले. गावकऱ्यानी जागृत युवा मंचचे आभार मानले असून या प्रसंगी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर,रुपेश गावडे, अक्षय चांदेकर, अरुण सुनतकर, सचिन खोब्रागडे, रवि गज्जलवार, मोहन चांदेकर यांचे विशेष योगदान लाभले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




