बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

*अखिल भारतीय झाडीपट्टी कलावंत परिषदेची कार्यकारणी गठित*





















झाडीपट्टी कलावंतांच्या समस्या लक्षात घेता वडसा येथे अखिल भारतीय झाडीपट्टी कलावंत परिषदेची कार्यकारणी गठित करण्यात आली. झाडीपट्टी रंगभुमीला लगभग दीडशे वर्षाचा सुवर्ण इतिहास आहे. विदर्भाची झाडीपट्टी रंगभूमी म्हणजे भविष्यातील सिनेमा सृष्टी म्हणायला हरकत नाही. परंतु कोरोना काळापासून कलावंताच्या अनेक समस्या पुढे येत आहेत त्यामुळे कलावंताच्या समस्या निकाली काढण्याकरिता,शासन दरबारी कलावंताची नोंद व्हावी याकरिता, शासकीय योजनाचा लाभ झाडीपट्टीतील कलावंताना मिळावा हे उद्दीष्ट्ये व ध्येय समोर ठेवून वडसा येथील श्रीराम मंदीरात अखिल भारतीय झाडीपट्टी कलावंत परिषदेची कार्यकारणी गठित करण्यात आली. परिषदच्या अध्यक्ष पदी  प्रा शेखर पटले यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी मुकेश गेडाम,उपाध्यक्ष पदी किरपाल सयाम गडचिरोली, प्रियंका गायधने गोंदिया,किशोर भाग्यवंत भंडारा,देवा कावडे चंद्रपूर यांची निवड करण्यात आली,सहसचिव पदी दुधराम कामडी भंडारा, ज्ञानेश्वरी कापगते गोंदिया,वासूकुमार गडचिरोली, सुनिल कुकुडकर चंद्रपूर, तर कोषाध्यक्ष पदी शंतनू कुडमेथे,प्रसिद्धी प्रमुख पदी राहुल पेंढारकर, होमदेव कोसमशिले मंगल मशाखेत्री ह्यांची निवड करण्यात आली. प्रमुख सल्लागार म्हणुन डॉ परशुराम खुने, नरेश गडेकर, राजा चिटणीस, देवेंद्र डोडके, अंबादास कांबळी, प्रा. डॉ. दिनकर कांबळी, डॉ प्रवीण शहारे यांची निवड करण्यात आली.  सदस्य म्हणुन विनोद काळे, प्रतिभा साखरे, उत्तम ऊके, शंभूदेवा मुर्कुटे, शेरू खान, पी लालचंद यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन राहुल पेंढारकर यांनी केले, प्रास्ताविक देवा कावडे यांनी केले तर आभार डॉ दिनकर कांबळी यांनी मानले या प्रसंगी ज्येष्ट कलावंत म्हणुन सारनाथ रामटेके, भारत रंगारी, विशाल बावणे, संतोष बारसागडे,दिवाकर बारसागडे, अमरकुमार मसराम, संजीव रामटेके,विश्वास पुडके, संदेश आनंदे, घनश्याम उपरीकर आदि झाडीपट्टीचे कलावंत उपस्थिती होते.



#झाडीपट्टी_नाटकाचे_स्वतंत्र_अध्यादेश_जाहीर_करा- अ.भा. झाडीपट्टी कलावंत संघटनेची मागणी 

-यंदा झाडीपट्टी कालावतांची दिवाळी अंधारात ? 


लॉकडाऊनच्या काळात नाट्यगृह बंद होती. तो शिथिल झाल्यावर देखील त्याकडे सरकारने कानाडोळा केला. अनेकांनी ती उघडण्यासाठी नाना प्रयोग करून पाहिले. त्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन झाली.त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने महाराष्ट्रातील नाट्यगृह उघडण्याविषयी निवेदन दिले. शिष्टमंडळाशी विचारविनिमय करून रंगभूमी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नाट्यगृह ५ नोव्हेंबर रोजी उघडण्याचे आदेश मा. मुख्यमंत्र्यानी शासकीय अधिकारी आणि विभागांना दिले आहेत. परंतु झाडीपट्टी रंगभूमी हे खूल्ले रंगमंच असून नाट्यगृहाच्या चौकटीत बसत नसल्यामुळे झाडीपट्टीच्या नाट्यसादरीकरणासाठी प्रशासकीय अधिकऱ्याकडून अडथळा निर्माण होत असते. त्यामुळे झाडीपट्टी नाटकांच्या परवानगीचे स्वतंत्र आध्यादेश चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर येथील संबंधित अधिकाऱ्याकडे जाहीर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. झाडीपट्टीची नाटकं सिझिनेबल असतात, दिवाळी पासुन झाडीपट्टी नाटकाचा हंगाम सुरु होतो परंतु 'झाडीपट्टी नाटकाचे स्वतंत्र अध्यादेश' जाहीर न केल्यास यंदा कलावंतांची दिवाळी अंधारातच जाईल काय ? अशी शंका कलावंतांनी व्यक्त केली आहे.




बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

*झाडीपट्टी नाटकांच्या परवानगीचे स्वतंत्र अध्यादेश जाहीर करा* -राहुल पेंढारकर, संतोष बारसागडे यांची मा. मुख्यमंत्र्यांकडे मागणी










अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने कोरोना संदर्भात सर्व शासकीय नियम पाळून नाट्य प्रयोग सादर करण्याचे आश्वासनावर महाराष्ट्रातील नाट्यगृह उघडण्याविषयी मा. मुख्यमंत्र्याना निवेदन दिले. शिष्टमंडळाशी विचारविनिमय करून रंगभूमी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नाट्यगृह ५ नोव्हेंबर रोजी उघडण्याचे आदेश मा. मुख्यमंत्र्यानी  शासकीय अधिकारी आणि विभागांना दिले आहेत. परंतु विदर्भाच्या पूर्वेस असलेली झाडीपट्टी रंगभूमी ही स्वतंत्र आणि समृद्ध असून खुले रंगमंच असलेली रंगभूमी आहे. त्यामुळे नाट्यप्रयोगाची परवानगी मिळविताना संबंधित अधिकाऱ्याकडून नाट्यकलावंताना अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

            झाडीपट्टी रंगभूमीचे  मुख्यालय गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे आहे. येथे 55 पेक्षाही अधिक नाटकाचे गृप आहेत. निर्माता, कलावंत, लेखक, दिग्दर्शक, नैपथ्यकार, वाहन चालक, पेंडाल वाले, पार्श्वसूचक यांचे पोट झाडीपट्टीच्या नाटकानांवर चालते. कोरोना काळात अनेकदा पोलिस स्टेशन मधून नाट्य प्रयोगाकारिता परवानगी नाकारण्यात येते, तर कधी चक्क पोलिस विभागातर्फे परवानगी मिळाल्या नंतरही नाटक सुरु असतांनाच नाटक बंद करण्याचे आदेश दिल्या जाते. अशा वेळेस नाट्यनिर्मात्यांवर नाटकाचा भुर्दंड बसतो आणि कलावंताना निराश होऊन परतावे लागते. 

            झाडीपट्टी रंगभूमी ही येथील कलावंताची आई आहे. रंगभुमीच्या भरौशावर येथील कलावंत जगतो. करिता समस्या लक्षात घेवुन ५ नोव्हेंबर पासून नाट्य गृह सुरु करण्यासाठी देण्यात येणा-या अध्यादेशात माननीय मुख्यमंत्र्यानी ‘झाडीपट्टी नाटकांच्या परवानगीचे स्वतंत्र अध्यादेश’ जाहीर करावेत अशी रास्त मागणी युवा रंगकर्मी तथा सामाजिक कार्यकर्ता प्रा. राहुल पेंढारकर आणि प्रा. संतोष बारसागडे यांनी ई-मेल द्वारे निवेदनातून केली आहे. 

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

गोंडवाना प्रशासकीय सेवा महाविद्यालय आलापल्ली येथे शिक्षकदिन साजरा

 





5 सप्टेंबर 2021:

कृषी ग्रामीण विकास बहूद्देशिय संस्था नागपूर द्वारा संचालित गोंडवाना प्रशासकीय सेवा महाविद्यालय आलापल्ली येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सर्वपल्ली राधाकृष्ण व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यवाहक कैलास वरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षक दिना निमित्त विद्यार्थी परिचय मेळावा, वृक्षारोपन, शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्याना उदबोधन करतांना प्राचार्य गुंडावार बोलल्या की, विद्यार्थी हा सदैव शोधक असायला पाहिजे. कोविड-19 मुळे शाळा महाविदयाल जरी बंद असले तरी अभ्यास नियमित करणे गरजेचे आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यासक्रमाचा विसर पडणार नाही आणि परिक्षा सुरळीत व सोप्या पद्धतीने पार पडेल.

कार्यकर्माचे संचालन बी.ए.सी.एस. प्रथम वर्षाची विद्यार्थीनी रोजा राऊत हिने केले तर आभार प्रा. अश्विनी पेदापल्लीवार यांनी मानले.

प्रसंगी प्रा. सुनील रामटेके, प्रा. राहुल पेंढारकर, अनिल इजगमकार, सुधाकर भोयर, तुषार पुलगमकार आदि उपस्तीत होते 

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

*अखेर नरभक्षक वाघाच्या बंदोबस्ता करीता मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडकला मोर्चा*















-नागरीकामध्ये तिव्र आक्रोश वनाधिका-याचे धाबे दणाणलले

-आंदोलनातील ढोल बजाव गडचिरोली कराना ठरला आकर्षणाचा व चर्चेचा विषय


भारतीय जनसंसद,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन,सर्वपक्षीय,ग्रामपंतायती,व परीसरातील जनतेच्या वतिने 

गडचिरोली जिल्ह्यात माणसावर हल्ला करीत प्रंचड धुमाकुळ माजविणा-या नरभक्षक वाघाने वनविभाग वडसा आणि  गडचिरोलीच्या वनव्याप्त  कार्यक्षेञात व शेतकरी बांधवाच्या शेतालगत  जवळपास 14 निप्षाप माणसाचे बळी घेतले.अनेक व्यक्तीना वाघाने  हल्ला करुन जखमी केले.एवढेच नव्हे तर अनेक शेतकरी कुटू्बातील गाई,म्हशी,बक-या फस्त केल्या ज्या मुळे परीसरातील जनता नरभक्षक वाघाच्या दहशतीत पुर्णपणे भयभित झाली असुनअनेक शेतकरी बांधव आपल्या शेतावर जाणे बंद केले.व परीसरातील नागरीक घराच्या बाहेर पडायला घाबरत अाहेत.यात शेक-याची अतोनाथ नुकसान झालेली आहे.तेव्हा  नरभक्षी वाघाला बंद करण्या करीता भारतीय जनसंसद,जिल्ह्यातील सर्वपक्षीय परीसरातील अनेक ग्राम पंचायती व जनतेच्या वतिने दिनांक01/09/2021  ते 04/09/2021 पर्यंत ठिय्या व जेलभरो आंदोलन करण्यात आले होते .तेव्हा गडचिरेलीच्या वनसंरक्षकानी नरभक्षक वाघाला लवकर जेरबंद करण्याचे आश्वासन देवूनही ऩिष्क्रीय व निष्काळजीपणा करणा-या वनविभागातील कर्मचारी व अधिका-याना सदर  वाघाला जेरबंद करण्या करीता अपयश  आल्याने परत नरभक्षक वाघाने  मौजा धुडेशिवनी येथील नामदेव  गुडी व जेप्रा येथील भांडेकर यांना ठार मारले.आणखी नरभक्षक वाघ किती बळी घेणार असा प्रश्न परीसरातील जनतेमध्ये निर्मान झाला असुन पुन्हा एकदा शासन, प्रशासनाचे व जिल्ह्यातील  जनतेचे लक्ष वेधण्या करीता गडचिरोली येथील इंदीरा चौकातुन तर मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर भारतीय जनसंसद,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ,सर्वपक्ष, परीसरातील ग्रामपंचायती व संतप्त नागरीकानी  मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर ढोलबजाव  मोर्चा आंदोलनाची धडक दिली.यात  सर्वसामान्य जनतेच्या हिताचे


*मुख्य मागण्या*

 14 निष्पाप  लोकांचे बळी घेणा-या व शेतक-याचे गाई,म्हशी,बकल्या फस्त करणा-या  नरभक्षक वाघाला एका दिवसात ठार मारा अन्यथा वनाधीका-याना वेठीस धरणार. 

उप वनसंरक्षक वनविभाग वडसा व उप वनसंरक्षक वनविभाग  गडचिरोली यांचेवर मणूष्य वधाचे  तात्काळ गुन्हा नोंद करा.

अकार्यक्षम वनाधीकारी व वनकर्नचा-यांची हकालपटी करा.

चुरचुरा येथील अंदाजे 40 एकर जागेत अवैद्य व्रुक्षतोड करुन वनसंपतीचे -हास करणा-या  दोषी वनरक्षक,वनपाल,वनपरीक्षेञाधीकारी याचेवर तातडीने निलंबनीची कार्यवाही करुन त्यांचेवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे नोंद करावे.

, नरभक्षक वाघाच्या दहशतीत शेती न करणा-य़ा  अथवा वाघाच्या भिती पोटी अनेक शेतकरी शेतावर न गेल्याने त्यांच्या शेत पिकाची नुकसान झालेलाी आहे.अशा सर्व शेतकरी बांधवाना महसुल व वनविभागा कडून  प्रत्येकी एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावे.

घोटचे  वनपरीक्षेञाधीकारी यांचे  कारकीर्दीत झालेल्या एकुन कामाची व त्यावरील एकुन खर्चाची एकुन आर्थीक व्यवहीराची  चौकशी समिती मार्फत सखेल चौकशी करुन कार्यक्षम वनपरीक्षेञाधीका-याची घोट वनपरीक्षेञात नियुक्ती करावे या व अन्य मागण्या संदर्भात  .वरील संपुर्ण मागण्याची पुर्तता करण्या करीता मोर्चाचे नेत्रूत्व देवाजी तेफा जेष्ट समाजसेवक,

डाँ शिवनाथ कुंभारे राज्य समिती विश्वस्त भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे जिल्हा संघटक भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष  विजय खरवडे, संसदेचे जिल्हा संपर्क प्रमुख योगेश कुडवे, जागृत युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष राहुल पेंढारकर, रमेश बांगरे,निलकंठ संदोककर व परीसरातील नागरीकाच्या वतिने करण्यात आले यात अनेक ग्रामपंचायत ,विविंध पक्षातील नेते मंडळी,व परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.

           मागण्या मंजूर न झाल्यास वनाधिका-याना घेराव करणार असल्याचे आंदोलनकर्त्यानी सांगीतले




                          

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

चंद्रपूर येथे विविध उपक्रम


 *सर्वांगीण शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे विविध उपक्रम*


चंद्रपूर : सर्वांगिण विकास बहूद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात आले. भदंत चंद्रमणी लॉन चंद्रपूर येथे सामाजिक कार्यकर्ता सारिका उराडे यांच्या जन्मदिनानिमित्त प्रबोधन साहित्य कला मंचच्या वतीने प्रबोधनपर भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रसंगी राजेंद्र गोडबोले सुरेश वेस्कडे, संतोष बारसागडे, किशोर तेलतुंबडे, जयशंकर वानखेडे, सोनू उज्जेंवार, राकेश निमसरकार, यशवंत उराडे, कमलताई धुरंदर, विद्यानंद शेंडे, अविनाश चहांदे, शुभम शेंडे, देविदास कातकर 

व परिवर्तन साहित्य कला फाउंडेशन चंद्रपूर चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 


*गरिबी निर्मुलन समितीची कार्यकारणी गठित* 

        वृक्षारोपन करून, व्यसनमुक्त झालेल्या लोकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी गरिबी निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. लालासाहेब गायकवाड आणि सल्लागार मा. ऍड. येवते पाटील एस. ए. सिनिअर ॲडव्होकेट सुप्रीम कोर्ट नई दिल्ली. माननीय लालासाहेब ह्यांच्या विशेष मार्गदर्शनातून गरिबी निर्मूलन समितीची धुरा हातात घेऊन या समितीचे काम संपूर्ण महाराष्ट्रात वाढवण्यासाठी सेवाभावी समाजसेवकांची नियुक्ती करण्यात आली. संतोष जीवनदास बारसागडे यांची विदर्भ प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात असून गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी राहुल पेंढारकर यांची निवड करण्यात आली.


प्रसंगी विद्यानंद शेंडे यांनी समाजसेविका सारिका उराडे यांच्या जीवन चरित्रावर थोडक्यात प्रकाश टाकताना बोलले की, ताई पंचेवीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात, कला क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

"दुखितांची वाट तू  

अबोलांचे ओठ तू 

तुझा गुलमोहर सखे

असाच बहरवा

तुझ्या ध्येय वेड्या कार्याला 

वसा सवित्रीचा द्यावा"

अशा शब्दात त्यांचे वर्णन केले. पुज्य भंते धम्माघोष मेत्ता यांनी बुद्धमांगल गाथेनी कार्यक्रम संपन्न केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिना उराडे तसेच आभार प्रदर्शन पापिता जूनघरे यांनी केले.







गरिबी निर्मूलन समिती च्या गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती

 







बुधवार, १६ जून, २०२१

चंद्रपुरात पार पडले अनाथ मुलीचे विवाह. -लग्न पत्रीकेतून दिला हुंडा मुक्त विवाहाचा संदेश




चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रोशना आत्राम ह्या अनाथ मुलीचे विवाह 'भिक्कू भदंत चंद्रमणी कुटी' येथे बौद्ध पद्धतीने पार पडले. लहान असतांनाच रोशनाचे आई वडील दगावले, त्यानंतर तिच्या नातेवाईकानी तिची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली होती. तिने स्वबळावर कसे-बसे आपले नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले. लॉक डाउन मधे रोशनाला भविष्याची चिंता भासू लागली होती. जागृत युवा मंच व सर्वांगीण विकास बहूद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळाला ह्याची माहिती मिळताच त्यांनी रोशनाला दत्तक घेतले व तिचे विवाह पारंपारिक बौध्द पद्धतीने लाऊन दिले. सदर विवाह राहुल पेंढारकर, सारिका यश उराडे, भंतेजी धम्माघोष मेत्ता, डॉ. गुलवाडे, प्राध्यापक विसादास भाडके, कृष्णा जी कूंडू, शुदोधन जी मेश्राम, श्रूती राकेश लोणारे, टीना उराडे, सुमीत रामटेके आदि लोकांच्या विशेष उपस्थितीत पार पडला.


लग्न पत्रीकेतून दिला हुंडा मुक्त विवाहाचा संदेश 

लग्न म्हंटले की हुंडा आलाच;हुंडा प्रथेमुळे कीत्येक विवाहित स्त्रियांचे जीवन उध्वस्त झाले आहे.परंतु हुंडा घेण्याची प्रथा समाजात काही कमी झालेली दिसत नाही. म्हणून हुंडा प्रथेचा विरोध करत लग्न पत्रिकेत भारतीय क्रांतिकारकांचे फोटो दर्शवून हुंडा मुक्त विवाहाचा संदेश देण्यात आला. 


वधूचे स्टेटमेंट : 

माझ्या सारख्या अनाथ मुलीला बहीण म्हणून दत्तक घेऊन विवाह करून देण्याची जबाबदारी राहुल पेंढारकर यांनी स्वीकारली तर सारिका यश उराडे यांनी आई वडिलांची भूमिका बजावत आशीर्वाद दिला. हे कार्य करण्यास काळीज आसवं लागतं आज समाजाला अशा समाजकार्यकर्त्याची गरज आहे. मी जीवनभर त्यांची ऋनी राहील. 

- रोशना आत्राम,वधू