शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

कुष्टरोगी जनाबाईच्या कुतुम्बीयांचे जागृत युवा मंच कडून सांत्वन




























चंद्रपूर ते वळसा प्रवास करत असताना 'ती' नेहमीच ट्रेन मधे भेटायची. अंगावर फाटका पातळ, एक चीरोटी डोक्याला बांधलेली, पोटाला भाकर आणि अंगावर कापड मिळाव म्हणून कुणी दोन पैसे देईल, ह्या अपेक्षेने एका डब्यातून दुसऱ्या डब्यात तिचा प्रवास सुरु असायचा. ती कुष्टरोगी असल्यामुळे एकेकाळी आमटे दाम्पत्याशी उपचारादरम्यान तिची नाळ जोडल्या गेली होती. मीही नेहेमीचा प्रवासी असल्यामुळे तीच्या हातात दहा पाच रूपये देऊन मला मोकळ होता यायचे. अशाच गाटि भेटितून झालेली तिची माझी ओळख.!
    ती कधी वेळ काढून जवळ बसायची आणि आपल्या कुटुम्बाविषयी सांगत बसायची. परवा भेटली तेंव्हा डोळ्यात पानी घेउन उरातल दुखः सांगत होती, सहन करतेय म्हणे स्वतःच्या तब्वेतीचा स्वतःलाच होणारा त्रास..! तीच दुखः तुमच्या आमच्या पेक्षा काही वेगळं नसलं तरीही वेगळंच म्हणवून घ्याव लागेल. ''आता नाही करवून होत हे सारं. त्रास होत अश्या जगण्याचा'', ती सांगत होती . सकाळी सहा वाजता तिची दिनचर्या सुरु होते आणि संध्याकाळी सहा वाजता ती घरी परतते. ती बोलली, ''ये एकदा मझ्या घरी.. भिकारडीण म्हणून येऊ नकोस तर आजी म्हणून ये.'' तिने तीच नाव सांगितल आणि आपल्या गावचा पत्ता दिला. तीच नाव जनाबाई  मु. पो. कान्पा, भंडारा जिल्ह्याच्या सीमेलगत हे गांव आहे आणि ह्याच गावच्या पाड्यावर राहणाऱ्या आदिवासी जमातीतली 'ती'.!
          काल दि 9/11/2019 ला आम्ही तिला भेटायला गेलो तेंव्हा ती घरी नव्हती, तीच कुटुम्ब होत. उदरनिर्वाहासाठी तीच विभक्त कुटुम्ब 'फोटो फेम' करून देण्याचा धंदा करतो. त्यामुळे त्यांना सतत स्थलांतरित रहावं लागतं. गरीब असली तरी काही माणस माणुसकी आणि संस्कृती विसरत नाही, ह्याचा अनुभव आम्हाला काल आला. तिला भेटण्यासाठी सकाळी 10 वाजता चंद्रपूरवरून निघालेली आमची जागृत युवा मंचची टीम 12 वाजता पोहचली. घरात काटकसर सुरु असताना त्यांनी चहा ठेवला आणि भर दुपारी जनाबाईच्या मुलगा आणि सूनेनी जेवणाची व्यवस्था केली. हे करताना त्यांचा चेहऱ्यावर आनंद उमटून दिसत होता. संध्याकाली 6 वाजता जनाबाई परत आली तेंव्हा जागृत युवा मंचच्या टीमला तिथे बघून ती भवनावश झाली. तिच्या कुटुम्बियांना आम्ही कपडे देऊन सांत्वन केले.
          टेम्पा येथील आदिवासी पाड्यातील लहान मुलामुलींना  कपड्यांची गरज आहे, अशी जनाबाईची सातव्या वर्गात शिकत असलेली नात सांगत होती.. परत एकदा जागृत युवा मंचची टीम नक्की जाणार आहे, त्यांच्या आनंदासाठी आणि आमच्या समाधानासाठी  !
जागृत युवा मंच विषयी जाणून घेण्याकरिता jagrutyuvamanch.blogspot.com येथे भेट द्या.

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

पूर ग्रस्तासाठी सरसावला जागृत युवा मंच - आम्ही हाक देतोय तुम्ही साथ द्या.

महाराष्ट्र राज्यातील पुणे प्रशासन विभागा अंतर्गत येणाऱ्या सांगली, कोल्हापूर येथे कृष्णा नदीला पूर येवून झालेल्या भिषण अतिवृष्टी मुळे हजारो लोकांचे नुकसान झाले आहे,अनेक लोक बेघर झाले आहे, ह्याची माहिती मिळताच अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत त्याच बरोबरीने समाजिक बांधिलकी जोपासत चंद्रपूर येथिल एस.आर. एम. कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या एन. एस. एस. विभागा च्या वतीने ''एक हात मदतीचा'' हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अहेरी/चंद्रपूर येथील स्वयंप्रेरणेने तरुणांना एकत्र घेउन काम करणारी सोशल टीम ''जागृत युवा मंच'' तर्फे 80 कपड्यांची मदत पूरग्रस्ताना करण्यात आली. त्यात मुलींचे सलवार, टॉप, नाईट पेंट, मुलांचे टी-शर्ट, लहान मुलांच्या कपड्यांचा सामावेश करण्यात आला होता. सदर कार्यक्रम प्रा. डॉ. सुनील साकूरे, उप प्राचार्य डॉ. नरेंद्र टिकले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रा. सेवा योजना समन्वयक प्रा. डॉ सुभाष गिरडे व प्रा. किरणकुमार मनुरे यांच्या पर्यवेक्षणात  घेण्यात आला .या उपक्रमासाठी मंच च्या सल्लागार प्रा डॉ जयश्री कापसे यांचे विशेष सहकार्य लाभले . उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहूल पेंढारकर, प्रशांत रामटेके, सुमित रामटेके, प्रवीण डोंगरे,अक्षय कामीडवार,अगस्टीन गायकवाड़, साई बच्चेवर,उमेश नगराडे,वैभव पोटे, योगेश कोल्हे, राशी उराडे, प्रनीता वावरे,स्वाति मेश्राम,प्रगति चुनारकर,जया दातारकर,मनीषा डुकरे,रानी नारनावरे, तृप्ति अलोने इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .

गुरुवार, ४ जुलै, २०१९

गरजू मुलांना कपड्यांचे वाटप

राहूल पेंढारकर ह्यांच्या वाढदिवसा निमीत्य. गरजू मुलांना कपड्यांचे वाटप जागृत युवा मंच अहेरी / चंद्रपूर तथा सर्वांगीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर च्या वतीने 
चंद्रपूर येथील रमाबाई नगर मधे 50 गरजू मुलांसाठी कपडे वाटप करण्यात आले. चंद्रपूर येथील रमाबाई नगरच्या झोपडपट्टी परिसरात अनेक कामगार लोक राहतात. या वस्तीत जीवनावश्यक वस्तू सोबतच मूलभूत गरजा व शिक्षणाचा अभाव आढळून येतो. येथील लहान गरजू मुलांपर्यंत जाऊन त्यांची मदत करताना जागृत युवा मंच तथा सर्वांगीण विकास शिक्षण प्रसारक मंडळच्या पदाधिकाऱ्यांना विशेष आनंद झाला. वस्तीतील पालकांनी या सामाजिक संघटनांचे आभार मानले आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारिका उराडे, राहूल पेंढारकर, प्रशांत रामटेके, राशी उराडे, राहूल रामटेके, किनारा खोब्रागडे, अंकित आदिनी, मयुरी आत्राम  सहकार्य केले.










गुरुवार, १६ मे, २०१९

*जागृत युवा मंच तर्फे पुस्तक दान उपक्रमास सुरुवात*




      
आज स्पर्धेचा युग आहे त्यामुळं विद्यार्थी स्पर्धेत उतरलेत. आपल्या जिल्ह्यात खोलवर नजर टाकली की आपल्याला शिक्षणाच्या दुनीयेतली पुस्तकाचं छत्र हरवलेली बरीच स्पर्धक सापडतील. त्यांच्या केवीलवान्या डोळ्यांत निरखून कधी बघितलात की ती आपलीच बांधव असलेलं लक्षात येईल. त्यांना पुस्तकं वाचण्याची आवळ आणि गरज आहे पण ती विकत घेण्यासाठी मात्र पैसे नाही. मग अशाच भावंडांसाठी जागृत युवा मंच पुस्तक दान उपक्रम राबवीत आहे. स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या पदावर गेलेली बरीच लोक आमच्यात आहेत. त्यांची जुनी पुस्तकं कुठल्यातरी कपाटावर धुळींत  जमा असतील. ती पुस्तकं तुम्ही तुमच्या हातांनी जागृत युवा मंचला सूपूर्त करता येईल. ती पुस्तकं युवा मंच  उपयोगात आणनार असून. तुमचच पुस्तक तूम्हच्या हातांनी गरजूना सप्रेम भेट देनार आहे. त्यामुळे गरजूंना  गैर वाटणार नाही हे नक्कीच आणि त्याच गरजू मुलांसाठी तुम्ही स्वतः एक प्रेरणास्थान ठराल. उपक्रम सुरु करतांना जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहूल पेंढारकर ह्यानी म्हंटले आहे की ,'आपला समाज हा दोन गटात विभागतो एक "आहे रे" आणि दुसरं "नाही रे" ह्यात आहे कडच्या लोकांकडे द्यायला बरंच देण्यासारख असतं पण मध्यम सापडत नाही. आज जागृत युवा मंचच्या माध्यमातून आम्ही तुमच्या घरी येत आहोत. आपण दिलेल्या पूस्तकाना योग्य व गरजू लोकांपर्यंत पोहचवीन्याची जवाबदारी आमची. ह्यात कुठलही गैरप्रकार होणार नाही ह्याची आम्ही हमी देतो. नक्की विचार करा आणि आमच्या बांधवांसाठी एक हात मदतीचा दया.'जागृत युवा मंचच्या वतीने आलापल्ली येथे पुस्तक दान उपक्रम राबविण्यात आला प्रसंगी मा. रामू मादेशी,शाम मादेशी आणि डॉ सलूजा यांनी 15 ज्ञानवार्धक पुस्तके भेट देऊन गरजूंना मदत करण्यास सहयोग केला आहे.प्रसंगी जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहूल पेंढारकर, रवि गज्जल्वार,मोहन चांदेकर, निशा खोब्रागडे, हर्षा अलोने, सुनीता दुर्गे, मोना गेडाम आदी उपस्थित होते.