सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

निशुल्क ' बाल आनंद शिबिरा' चा पाचवा दिवस

दिनांक 29/08/2020 

आज शिबिराचा शेवटचा दिवस म्हणून मुलांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. यातून मूलभूत, काही साध्या गोष्टी शिकवित्या आल्या. स्वावलंबन - स्वयंपाक करणे, भांडी धुणे, स्वतःचं काम स्वतः करणे.

ह्याचे चार उद्देश आहेत -


१) गरीबी - दररोज इतकी भांडी सलग 30 दिवस धुतल्यावर एखाद्याला 700 -800 रुपये महिन्याला मिळतात हे समजावे. जेणेकरून पैसे खर्च करताना आपण किती काळजी घ्यायला हवी याची जाणीव व्हावी.


२) भांडी धुतल्यावर उठताना कंबर आणि पाठ कशी भरून येते याचा अनुभव घेतल्यावर घरातील महिलांच्या कष्टांची किंमत कळावी.

३) कुठलेही काम कमीपणाचे नाही हे समजावे.

४) अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा दंभ, अहंकार न व्हावा.

मुलांना परत काही किरकोळ पण महत्वाच्या गोष्टी शिकवता आल्या-भाजी, टमाटे कापण्यापूर्वी नीट धुवून घ्यावी. जेवतांना हात आणि ताट धुवून घ्यावी. 

टायर गेम- हा खेळ आहे. ह्यात स्पर्धा असते. स्पर्धेत दोन गट सहभागी असतात. म्हणून जिंकण्याकरिता एकमेकांचे सहकार्य महत्वाचे असते. शेवटचा दिवस असल्याने मुलांनी खूप एंजॉय केलं. येवढ्या दिवसात कुणी कुणाचं नकळत मन दुखावलं असेलच त्यामुळे 'सॉरी, थँक्स आणि परत भेटुया' असं म्हणता आलं.