शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

जागृत युवा मंच च्या वतीने मुकबधीर विद्यार्थ्यांना "आईची ब्लँकेट" वितरण..





हिवाळा ऋतू मुळे सर्विकडे थंडी जोर धरू लागली आहे. थंडीमुळे उन्हात सुद्धा गारठा जाणवायला लागला आहे. काही दिवसापूर्वी जागृत युवा मंचने एकलव्य निवासी मुकबधीर विद्यालय, आलापल्ली येथे भेट देऊन विचारपूस केली होती. तेथील विद्यार्यांना स्वेटर आहे पण रात्री पांघरूण घायला ब्लँकेट अपुरे असल्याचे कडले. एकलव्य मुकबधीर विद्यालय आलापल्ली येथे एकूण 40 विद्यार्थी संख्या आहे. विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेता आणि थंडीपासून मुकबधीर भावंडांचे संरक्षण व्हावे म्हणून  त्यांना "आईची ब्लँकेट" चे वितरण करण्यात आले. आनंद द्विगुणित व्हावा म्हणून त्यांना चॉकलेट खाऊ म्हणून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी साईन लेंग्वेज मधे जागृत युवा मंचचे स्वागत केले. मा. मुख्याध्यापक चौधरी सर यांनी जागृत युवा मंचचे आभार मानले. हे एक वेगळे आकर्षण होते आणि एक सुखद अनुभव होता. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री अशोकजी आईंचवार, एकलव्य मुकबधीर विद्यालय येथील मुख्याध्यापक श्री चौधरी सर, जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, रवि गज्जलवार,विजय गड्डमवार,गीरीधर दलाई,मंगेश ऊइके,अक्षय चांदेकर, आकाश पेंदोर, मनोज गेडाम,निशा खोब्रागडे,प्रिया मडावी,पिंकि ऊइके, कल्याणी ऊइके,निता आलाम,कल्पना पेंदोर, रेखा डे, आरती गेडाम, स्नेहल जॉब, ज्योती मडावी,एकलव्य मूक बधिर विद्यालय आलापल्ली येथील सर्व शिक्षक वृंद आणि जागृत युवा मंच चे सर्व पदाधीकारी ह्यांच्याकडून सहकार्य लाभले.

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

पण तिच्या शिक्षणाच काय..?

दि. 13 नोव्हेंबर 2017 वेळ 10:30 मी वडसा वरून नागपूर ला जायला निघालो आहे. नागभीढ स्टेशन वर मला एक लहानशी मुलगी खेळत असताना दिसली. तिचे कापड मडलेले होते. मी तिला तीच नाव विचारल पण ती गप्प होती. हे बघून तिचे वडील माझ्या जवळ आले आणि त्यानी माला सांगितल की त्या मुलीची आई हरवली आहे. त्यांना बल्लारशाला त्या मुलीच्या मामाकडे जायचं आहे पण आमच्याकडे तिकिट काढायला पैसे नाहीत, मी त्यांना तिकीट काढून दिल. मी त्यांना विचारल  तुमची मुलगी कुठल्या वर्गात आहे ? तेव्हा तो सांगत होता माला माझ्या मुलीला शाळेत घालायचय पण माझी परिस्थिती वाईट आहे. मला फक्त त्यांना तिकीट काढून देता आलं ह्याचं समाधान वाटतंय, पण त्या मुलीच्या शिक्षणासाठी काहीच करू शकलो नाही ह्याच मात्र दुःख होतय. "ती" आणि तिचे वडील गावी पोहचतील पण ; तिच्या शिक्षणाच काय ?

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

गरमेंट प्रशिक्षण सम्पन्न..

सर्वसाधारण व विशेष घटक योजने अंतर्गत प्रथमच अहेरी येथे अनुसुचित जातीतील व सर्वसाधारण इतर जातीतील युवतींसाठी गारमेंट उध्योजकता विकास कार्यक्रम राबवीन्यात आले होते. एकंदरीत ह्या कार्यक्रमाला युवतींनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली मार्फत घरबसल्या बेरोजगार व होतकरू युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून प्रशिक्षण देण्यात येते. सदर कार्यक्रम अहेरी येथे सम्पन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी एम सी ई डी चे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री संदीप जाने,श्री गाईन ,पवन भांडेकर, तालुका समन्वयक राहुल पेंढारकर,प्रशीक्षीका रेखा कौर उपस्थित होते.

*राहुल पेंढारकर यांना राज्यस्तरीय आदर्श कर्यगौरव पुरस्कार प्रदान..*



 मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुनीजन गौरव परिषद सोहळा नागपूर येथे मंगळवरी दु 2 वाजता पार पडला. ऍड. कृष्णाजी जगदाडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामांकित मानकरी गुनीजन गौरव परिषदेत उपस्थित होते. याप्रसंगी राहुल पेंढारकर ह्यांना राज्यस्तरीय गुनीजन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. लक्षवेधी गौरवपदक,विशेष महावस्त्र, खास मानपत्र, पुश्पहार व श्रीफळ अशा प्रकारे पुरस्काराचे स्वरूप होते. राहुल पेंढारकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यानी "आई जन्माची शिदोरी" , "शोधू कुठे किनारा" ह्या सामाज प्रबोधनात्म्क नाटकाचे लेखन केले आहे. "छब्बू  ताईची शाळा" या गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेवर आधारित ऑडियो सीडी मधे गीत लेखन व गायन केले तर "भ्रूण कन्येचा टाहो" ह्या कवीता संग्रहात त्यांची कवीता समाविष्ट करण्यात आली आहे. शिवाय विविध वर्तमान लेख प्रकाशित झाले आहेत. कलेचा वारसा जपत ते सामाजिक बांधिलकी सूद्धा जोपासत आहेत. जागृत युवा मंचच्या माध्यमातून ते यूवाकाना एकत्र करून  सामाजिक उपक्रम राबवत असतात. या कार्याची दखल घेता त्याना 2014 मधे कोल्हापूर येथे राज्यस्तरीय ड्रा बाबासाहेब आम्बेडकर जनमीत्र पुरस्कारानी गौरविण्यात आले होते. हा त्याना मिडालेला दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यामुडे त्यांचे सर्वत्र  कौतुक होत आहे. याप्रसंगी रुपेश गावडे, रवी गज्जल्वर, गीरीधर दलाई , विजय गड्डमवार जागृत युवा मंचचे सर्व सदस्य उपस्थित होते.

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

*जागृत युवा मंच तर्फे विद्यार्थी दिवस साजरा * अवांतर वाचनासाठी विद्यार्थ्याना दिला बाबासाहेबांच्या पुस्तकांचा खजिना





  महाराष्ट्र शासनाने सात नोव्हेंबर हा ड्रा बाबासाहेब आम्बेडकर ह्यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस म्हणून जाहीर केला होता.शिक्षण हेच उन्नतीचे साधन असल्यामुळे जागृत युवा मंच अहेरीच्या वतीने पहिलाच विध्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री शैलेश कोसरे सर, प्रमुख अतिथी म्हणून भगवंतराव महाविद्यालय येथील श्री महाकालकर सर, संत मानवदयाल विद्यालय येथील श्री निकोडे सर व रेखा डे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पुस्तक वाचन बरोबरच अवांतर वाचन देखील तेव्हढेच महत्वाचे आहे हे ओळखुन जागृत युवा मंच अहेरीच्या वतीने विद्यार्थ्यांना बाबासाहेब आम्बेडकर व तथागत गौतम बुद्ध ह्यांच्या पुस्तकांचा खजिना शुभेच्छा स्वरूपात देण्यात आला. वाचनातून परिवर्तन घडून यावे आणि भावी पिढी ही समतावादी विचारांची निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.याप्रसँगी विचारमंचावर अध्यक्ष स्थानावरून बोलतांना श्री शैलेश कोसरे ह्यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हंटले की, बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व खूप महान होते विद्यार्थयानी त्यांचे अनुकरण करवायास पाहिजे. वाचनातून विचार वाढीस येतात आणि स्व चा विकास होतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास करण्यासाठी वाचनालयाची निर्मिती करायला पाहिजे, अशे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, अलोने दादा, हर्षा अलोने, स्नेहल जॉब, शीवानी बीस्वास, रागिनी ऊइके यांनी सहकार्य केला. संचालन सौ. गीता अलोने, प्रास्तवीक चेतना चालूरकर तर आभार राहुल पेंढारकर यांनी मानले.

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

*जागृत युवा मंचने लग्नात दिली संविधानाची भेट

अलीकडे लग्न समारम्भात  लग्नभेट म्हणून विविध वस्तू दिल्या जातात. बदलत्या  काळाबरोबरच पैशाची उधडन करून डिजेवर पाय थीरकताना दिसतात. अशा स्वरूपात पैशाची उधळण होत असताना आपण पाहत असतो. लग्न समारम्भ मोठ्या थाटात पार पडावे म्हणून वधू कडून हुन्डा घेतला जातो. समाजात हुन्डा पद्दती पारम्पारीक स्वरूपात अजूनही रुजलेली दिसते.  परंतु आलापल्ली येथील गजानन गेडाम या युवकाने वधुकडुन कुठलिही हुन्ड्याची अट न ठेवता आंतरजातीय विवाह करून एक सामाजिक संदेश दिला आहे. त्याचेच आभार मानत जागृत युवा मंचने लग्नसमारम्भात सहभागी होऊन संविधानाचे पुस्तक भेट स्वरूपात दिली. जागृत युवा मंचने हुन्डा विरोधी पत्रके काडून समाज जागृती केली होती. अशा विवाह सोहड्यामुळे गजानन गेडाम व त्यांच्या कुटूम्बियांचे जागृत युवा मंच कडून कौतुक होत आहे. या प्रसंगी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, रवि गज्जल्वार, राकेश रापर्तीवार,विजय गड्डमवार गीरीधर दलाई,रेखा डे, शीवानी बीस्वास, आरती गेडाम, रागिनी उईके आदि उपस्तीत होते.

सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

विडियो पहा



ह्याला जवाबदार कोण..?

आज (दि.25/9/2017) रात्रौ 10:30 वाजता मी आलापल्ली वरून अहेरीला यायला निघालो. मी दुचाकीने प्रवास करत होतो आणि त्यावेळेस माझा मित्र माझ्या सोबत होता. प्रवासात नागेपल्ली ह्या गावाच्या मध्यरस्त्यावर एका गायीचे वासरू घायाळ परिस्थितीत पडलेले आढळून आले. आम्हाला त्याची काही मदत करता येईल का ह्या उद्देशाने आम्ही बाईक थाम्बवली. त्याच्या शरिरावर गम्भीर दुखापत झाली होती.अपघात कुण्या अज्ञात चारचाकी वाहनाने झाला असावा हे त्याच्या जखमावरून सहज तर्क लावता येत होतं. हॉस्पिटलमधे नेण्याकरीता मदत लागेल म्हणून मी माझ्या मित्रांना फोन करत असतानाच त्याच्या शरिरावर झालेली जखम त्याला असाह्य झाली आणि आमच्या डोळ्यांदेखत त्याचा जीव गेला...!
ही घटना तुमच्या आमच्या साठी काही नवीन नाही; पण विचार करायला भाग पडणारी घटना आहे. घडलेल्या प्रसंगांवरून एक नजर फेरली की आपल्या सहज लक्षात येतं आणि आपोआप एक प्रश्न उभं रहातं, "ह्याला जवाबदार कोण ?" आपल्या गुरांची जवाबदारी न स्विकारता दुर्लक्ष करणारे त्यांचे मालक, की कोंडवाळा न बांधता त्यांना मोकाट फिरायला भाग पाडणारे ते स्थानिक प्रशासन..? रस्त्यावर बाजार करून बसलेली ती निष्पाप, नासमझ जनावरं की, त्यांचा जराही विचार न करता त्यांना तुडवून पुढे निघून जाणारे स्वतः आपण ? असो.! तो गेल्यावर एका गाईच्या संवेदना जाग्या झाल्या आणि ती त्याला आपल्या जीभेने चाटत होती, तो गेल्याचं तिलाही कळलं असेल कदाचित ! त्यांच्या कुटुम्बाची अवस्था बघून काही क्षणासाठी का होईना माझ्याही डोळ्यात पाणी आलं. कारण ती गाय असली तरी एका वासराची माय होती. आम्ही त्याची मदत करू शकलो नाही ह्याच दुःख होतय. ह्याला जवाबदार कोण ? दोष कुणाला द्याव ? हे माला कळत नाही. पण आपणा सर्वाना एक विनंती करतो. वाहने हळु चालवा, आपल्या हातून कुणाचा अपघात होणार नाही ह्याची काळजी घ्या. जगा आणि जगू दया. कुणास ठाऊक, कुणीतरी कुणाची आतुरतेने वाट बघत असेल..

-राहुल पी. पेंढारकर

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

गारमेंट निर्मिती उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन.


.

सर्वसाधारण व विशेष घटक योजने अंतर्गत प्रथमच अहेरी येथे अनुसूचित जातीतील व सर्वसाधारण इतर जातीतील महिला व युवतींकरीता गारमेंट निर्मिती उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्योजकता विकास केंद्र, गडचिरोली मार्फत सदर कार्यक्रम घेण्यात येते. यामार्फत बेरोजगाराना रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्देश असतो. कार्यक्रमातून शासकिय योजना व अनुदान विषयी माहिती देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा निरीक्षक श्री बढे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक पवन भांडेकर,प्रशिक्षिका रेखा सिंग, कार्यक्रम समन्वयक, जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, रवि गज्जलवार,राकेश रापर्तीवार,विजय गड्डमवार,गीरीधर दलाई आदि उपस्थित होते

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

जागृत युवा मंचच्या वतीने  5 सप्तेम्बर 2017 ला निबंध स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धकांना बक्षीस वितरण करताना जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ..!

मित्रांनो... 5 सप्तेम्बर 2017 ला जागृत युवा मंच तर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. आपण सर्व होतात म्हणूनच हे कार्यक्रम घेणे श्यक्य होऊ शकल. यात अपना सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. पुढेही आशेच सहकार्य करत रहाल अशी अपेक्षा करतो.आपना सर्व सहकारी मित्रांचे मनापासून आभार.









आज दि. 13 सप्तेम्बर 2017 ला गीताताई अलोने यांनी जागृत युवा मंच च्या पुस्तक दान कार्यक्रमात सहभागी होऊन 9 ज्ञानवर्धक पुस्तक दिलीत त्याबद्द्ल त्यांचे आभार.

बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

*जागृत युवा मंच च्या वतीने शिक्षक दिन साजरा*..

*ड्रा. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या जन्मदिवसाला दिली सावित्री ज्योतिबा फुलेंच्या इतिहासाची भेट...!जागृत युवा मंच अहेरी/आलापल्ली च्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. शिक्षक दिनाच्या नीमीत्याने निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा व पुस्तक दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत अ गटातून " सावित्रीबाई फुले"विषय घेण्यात आला होता. त्यामधून प्रथम पारितोषिक मनिष खोब्रागडे,द्वितीय पारितोषिक ईश्वर पोर्तेत तर त्रुतीय पारितोषिक संस्कृति हीचामी हिने पटकावला. ब गटातून "धरती आबा बिरसा मुन्डा" हा विषय घेण्यात आला होता ह्यमधून प्रथम पारितोषिक आकाश सरकार, द्वितीय पारितोषिक रमेश मडावी तर तृतीय पारितोषिक रीता इश्टाम ह्यांनी पटकावला. क गटातून "हुन्डा प्रथा एक सामाजिक समस्या" हा विषय घेण्यात आला होता ह्या गटातून सुजाता खोब्रागडे प्रथम, चंदनी गेडाम द्वितीय तर तृतीय पारितोषिक पायल चीलकम्वार हिने पटकावला. रांगोळी स्पर्धेत चेतना मूरमुरवार प्रथम,सुजाता खोब्रागडे द्वितीय तर तृतीय क्रमांक रेश्मा हीचामी हिने पटकावला. शिक्षक दिनाच्या शुभपर्वावर "मी सावित्री जोतिबा फूलेचा शिलेदार बोलतोय" हा एकपात्री प्रबोधनपर नाट्यप्रयोग अक्षय लोणारे यांनी सादर केला. श्री मूक्कावार सर ह्यांचा सहपत्नी आदर्श शिक्षक म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम क्रीडा संकुलन आलापल्ली येथे घेण्यात आला. कार्यक्रमाला उदघाटक म्हणून माजी आमदार दीपकदादा आत्राम, अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कन्कडालवार तर विशेष अतिथी म्हणून उपसरपंच पुष्पाताई अलोने,विजयभाऊ खरवडे, प्रा. आनंद अलोने, लैजाताई चालूरकर, सौ दलाल मॅडम, श्री मूक्कावार सर, श्री गणपत तावाडे, सौ भगत मॅडम आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन जागृत युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष राहुल पेंढारकर व स्नेहल जॉब ह्यांनी केले. तर आभार आरती गेडाम यांनी मानले. सदर कार्यक्रमाकरीता सचिन खोब्रागडे , विजेंद्र शील,रवि गज्जलवार,विजय गड्डम्वार,मधुकर अग्गूवार,राकेश रापर्तीवार,संतोष सगडीवार,गिरिधर दलई,साजन ऊइके,,मनोज गेडाम,दीपक गुप्ता,प्रिन्स मोर्गोनी,रोशन गुप्ता,फलाश तावाडे,शीवानी बिश्वास, पूनम खांदरे,मोनिका मूरमूरवार,निशा खोब्रागडे,सोनाली भट,पायल कोडापे आदि जागृत युवा मंचचे शिष्टमंडळनी सहकार्य केला

                            
जागृत युवा मंच चे शिष्टमंडळ

रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

आज दि. 3 सप्तेम्बर 2017 ला आलापल्ली येथील उपसरपंच श्रीमती पुष्पाताई अलोने ह्यांनी जागृत युवा मंचच्या पुस्तक दान कार्यक्रमात सहभागी होऊन भारतीय संविधान आणि इतर ज्ञानवर्धक पुस्तके गरजूसाठी दान दिल्याबद्दल जागृत युवा मंच तर्फे त्यांचे आभार.
पुस्तकं स्विकारताना जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ  

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

सौ. मेश्राम काकू कडून  पुस्तक दान कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता तब्बल 16 पुस्तकं प्राप्त झाल्याबद्दल जागृत युवा मंच तर्फे आभार.


गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७


दि. 31/08/2017 ड्रा नैताम मॅडम, आलापल्ली यांनी जागृत युवा मंच च्या पुस्तक दान कार्यक्रमात सहभागी होऊन एकूण 17 ज्ञानवर्धक पुस्तक गरजू साठी दान केल्याबद्दल त्यांचे जागृत युवा मंच तर्फे विशेषभार.

बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

 दि.30/08/2017 मा. श्री सुरेशजी दोंतुलवार सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक,चेरपल्ली (रा.अहेरी) यांनी जागृत युवा मंचच्या पुस्तक दान कार्यक्रमात सहभागी होऊन 13 पुस्तकं (ज्ञान वर्धक व शैक्षणिक) दान केल्याबद्दल जागृत युवा मंच तर्फे विशेष आभार.
पुस्तक स्विकारताना जागृत युवा मंच चे पदाधीकारी  

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

आज दि. 29/08/2017 छाया उईके मॅडम यांनी जागृत युवा मंचच्या #पुस्तक_दान_कार्यक्रमात सहभागी होऊन आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने लेखक-ओहोळ डी. आर. तब्बल 12 पुस्तक दान केल्याबद्दल जागृत युवा मंच तर्फे विशेष आभार. 
पुस्तक स्विकारताना जागृत युवा मंच चे पदाधीकारी 

शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७

*भव्य पुस्तक दान कार्यक्रम* एक हात मदतीचा...


आज आम्ही आपल्याकडे एक मदतीचा हात मागण्यासाठी येत आहोत. आम्ही सर्व सामाजिक प्राणी आहोत. आमचं जगणं एकमेकांवरच निर्भर करतं. अन्न,वस्त्र,निवारा ह्या मानवाच्या प्रमुख मूलभूत गरजा आहेत. पण आता जगण्याची व ह्या गरजांची व्याख्या बदलायला हवी असं आम्हाला वाटू लागलय. वाचन हे सूद्धा एक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कारण जगण्यासाठी स्पर्धेत उतराव लागतं आणि स्पर्धेत टिकण्यासाठी आधी पुस्तकं वाचावी लागतात ही वास्तविकता आहे.
आज स्पर्धेचा युग आहे त्यामुळं विद्यार्थी स्पर्धेत उतरलेत. आपल्या जिल्ह्यात खोलवर नजर टाकली की आपल्याला शिक्षणाच्या दुनीयेतली पुस्तकाचं छत्र हरवलेली बरीच स्पर्धक सापडतील. त्यांच्या केवीलवान्या डोळ्यांत निरखून कधी बघितलात की ती आपलीच बांधव असलेलं लक्षात येईल. त्यांना पुस्तकं वाचण्याची आवळ आणि गरज आहे पण ती विकत घेण्यासाठी मात्र पैसे नाही. मग अशाच भावंडांसाठी आम्ही एक हात मदतीचा पुढे करूयात. स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या पदावर गेलेली बरीच लोक आमच्यात आहेत. त्यांची जुनी पुस्तकं कुठल्यातरी कपाटावर धुळींत  जमा असतील. ती पुस्तकं तुम्ही आम्हाला तुमच्या हातांनी सूपूर्त करा. ती पुस्तकं आम्ही उपयोगात आणू. तुमचच पुस्तक तूम्हच्या हातांनी गरजूना सप्रेम भेट देऊ. त्यामुळे त्यांना गैर वाटणार नाही हे नक्कीच आणि त्याच गरजू मुलांसाठी तुम्ही स्वतः एक प्रेरणास्थान ठराल. आपला समाज हा दोन गटात विभागतो एक "आहे रे" आणि दुसरं "नाही रे" ह्यात आहे कडच्या लोकांकडे द्यायला बरंच देण्यासारख असतं पण मध्यम सापडत नाही. आज जागृत युवा मंचच्या माध्यमातून आम्ही तुमच्या घरी येत आहोत. आपण दिलेल्या पूस्तकाना योग्य व गरजू लोकांपर्यंत पोहचवीन्याची जवाबदारी आमची. ह्यात कुठलही गैरप्रकार होणार नाही ह्याची आम्ही हमी देतो. नक्की विचार करा आणि आमच्या बानधवांसाठी एक हात मदतीचा हात दया...!

*ज्या विचारवंत लोकांना अशा गरजुंसाठी प्रामाणिकपणे पुस्तक दान करण्याची इच्छा आहे त्यानी पुढील दूरध्वनीवर सम्पर्क साधावा. स्पर्धा परीक्षा व सामाजिक ज्ञानवर्धक पुस्तके स्वीकारले जातील. तुमच्या आठवणीतील ह्या सुवर्ण क्षणांना आम्ही फोटो स्वरूपात आमच्या सोशियल साईट वर प्रकाशित करू.*

सम्पर्क:- राहुल पी पेंढारकर 7057606384,9421078110, सचिन खोब्रागडे 7304595155, रवि गज्जलवार 9405565324, विजय गड्डम्वार 9404247639

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

*जागृत युवा मंचचा अनोखा उपक्रम.. *मतीमंद व मुकबधिर मुलांसोबत साजरा केला रक्षाबंधन...!!!

जागृत युवा मंचच्या वतीने चाणक्य मतीमंद निवासी विद्यालय व एकलव्य मूकबधिर निवासी विद्यालय,नागेपल्ली येथे एक आगळा वेगळा रक्षाबंधन साजरा करण्यात आला. जीवनप्रवाहापासून वंचित असलेल्या मुलांना रक्षाबंधन सण अनुभवता यावा ह्याकरीता मैत्रीच्या नात्याबरोबरच बहीण भावाच्या अतूट बंधनाने जागृत युवा मंचचा परिवार एकत्र आला. बहीण भावाचे अतूट नाते अनुभवता यावे म्हणून जागृत युवा मंचच्या मुलींनी मतीमंद व मूकबधिर मुलांना राख्या बांधल्या. व जागृत युवा मंचच्या मुलांनी त्यांच्या कडून बांधून घेतल्या. मुलांना याप्रसंगी खाऊचे वाटप करण्यात आले.अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे विद्यालयात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जागृत युवा मंचने मतीमंद व मूकबधिर मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता अपुलकीची व जवळीकतेची प्रतिक्रिया मुलांनी व्यक्त केली व मुले स्वतःचे पालक आल्याप्रमाणे आनंद व्यक्त करत होते. जागृत युवा मंचचा परिवार जाण्यास बाहेर पडटाच "नका जाऊ" असं म्हणून त्या मुलांनी जागृत युवा मंचला आडवून धरल होतं. ह्या वातावरनाने विद्यालयातील शिक्षक सूद्धा भारावून गेले. कार्यक्रमा प्रसंगी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, विजेंद्र शील,रवि गज्जलवार,विजय गड्डम्वार,मधुकर अग्गूवार,राकेश रापर्तीवार,संतोष सगडीवार,साजन ऊइके,प्रीतम पेटेवार,मनोज गेडाम,दीपक गुप्ता,प्रिन्स मोर्गोनी,नागेश सिंका,रोशन गुप्ता,फलाश तावाडे,शीवानी बिश्वास,निशा खोब्रागडे,सोनाली भट,विद्या राऊत, रागिनी ऊइके आदि जागृत युवा मंचचे शिष्टमंडळाची उपस्तीत होते.

मंगळवार, २५ जुलै, २०१७

5 सप्टेम्बर 2017 रोजी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रामविषयी 
चर्चा करतांना जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ...

शनिवार, १ जुलै, २०१७

*जागृत युवा मंचचा झाडे लावा उपक्रम *दोनशे झाडे लाऊन कृषी दिन केला साजरा..

जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ 




















गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि ह्या जिल्ह्याला लाभलेली निसर्गसम्पदा ह्याकरीता जिल्ह्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. येथील घनदाट वृक्षवल्ली आणि पर्यावरण पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. येथील निसर्गसम्पदेत भर घालता यावी म्हणून कृषी दिनाचे औचित्य साधून जागृत युवा मंचने तब्बल दोनशे रोप लावून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनास गती दिली आहे.दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषता निसर्गसम्पदेचा -हास होत असल्याने तापमान वाढ आणि हवामानात देखील बदल होत आहे. ह्या सर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे रूतूमान बदलत चालले आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन,जतन व संरक्षण करून समृद्ध व सम्पन्न गावाची भौगोलीक निर्मिती करने ही काळाची गरज ओळखून जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करणारी वृक्ष, औषधोपयोगी व फळ वृक्षांना वृक्षारोपणात प्राधान्य देण्यात आले. त्यामधे सीताफफळ,आवडा,पेरू, जाम्बुळ, करंजा,गोडनीम,कडूनीम,बेहेडा,सीसम, ई प्रजाती होत्या.सार्वजनिक स्थळी,चर्च, महावीध्यालय, मंदिर,दवाखाना, बगीचा ई. परिसरात वृक्षारोपण करण्यात आले असून "एक घर एक झाड" ही संकल्पना रुजवत प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड स्वत:च्या घरी लावण्यासाठी प्रेरित करण्यात आले. विशेष बाब म्हणजे ह्या संकल्पनेने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दुणावला आणि झाडे लावा उपक्रमासाठी मोठ्या संख्येने युवांचि गर्दी जमली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लॉरेन्स चर्च नागेपल्लीचे फॉदर स्टेफीन,श्रीराम मंदिर आलापल्ली येथील मडावी महाराज, असीसी सेवा सदन हॉस्पिटल आलपल्ली येथील कर्मचारी, सेंट फ्रँसेस स्कूल अलापल्ली येथील प्रिंसिपल सिस्टर स्नेहा, ग्रीनलँड इंग्लिश मीडियम स्कूल येथील शिक्षकवृंद, गोंडवाणा कृषी विद्यालय नागेपल्ली येथील प्रा. वरेकर, जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, युवा विकास संस्थेचे रुपेश गावडे, रवि गज्जलवार, विजेंद्र शील, विजय गड्डमवार, खुशाल शील, साजन उईके, विपुल शील,आकाश पेंदोर,मनोज गेडाम, राहुल सडमेक, कु निशा खोब्रागडे, शीवानी बिश्वास, सोनाली भट, मोनिका मुरमूरवार, कोमल सिंह, रानी उईके,पायल कोडापे आदि जागृत युवा मंचच्या शिष्टमंडळानी सहकार्य केला.