रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

शासकीय योजनांच्या जनजागृती करिता कलापथकचे सादरीकरण

गडचिरोली




































एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड तथा आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातींच्या योजनांची जनजागृती करण्यासाठी भामरागड आणि एटापल्ली केंद्रामधे कलापथकाचे आयोजन करण्यात आले.

     महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यात शैक्षणिक योजना, शेतीविषयक योजना, केंद्रवर्ती अर्थ संकल्प योजना अशा अनेक योजनांचा सामावेश होत असतो. भामरागड तथा एटापल्ली केंद्रातील अनुसूचित जमातीच्या लोकांपर्यंत पथनाट्य, गोंडी गीत, गोंडी नृत्याच्या माध्यमातून शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच व्यसनमुक्ती, कुपोषण, शिक्षण या विषयावर प्रबोधन करण्यात आले.

      कलापथकाचे सादरीकरण एटापल्ली व भामरागड केंद्रातील चंदनवेली, गेदा, जीवनगट्टा, उडेरा, कांदोळी, ताळगाव, हेमलकसा, धोडराज, लाहेरी व भामरागड या गावात करण्यात आले असून कार्यक्रमाचे आयोजन रोशना चव्हान, प्रकल्प अधिकारी, भामरागड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. कलापथकाचे सादरीकरण राहुल पेंढारकर, सुमित रामटेके, गणेश मडावी, नयन गेडाम, संदीप आलाम, रमेश आलाम, वंदेश आवळे, टिना उराडे, पायल सिंग यांनी केले. कलापथकाच्या कार्यक्रमात गावातील पोलीस पाटिल,नगर सेवक,सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामवासी उपस्थित होते

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना निमित्त निःशुल्क भोजन वितरण

 













चंद्रपूर : 
सर्वांगीण विकास बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ तथा आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून निःशुल्क भोजन वितरण करण्यात आले. यादिवशी लाखो बौद्ध बांधव विविध जिल्ह्यातून दीक्षाभूमी चंद्रपूर येथे येत असतात, त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये, यादिवशी कुणीही उपाशी राहू नये, गरजू जनतेला एका वेळेच्या जेवणाची व्यवस्था व्हावी,म्हणून निःशुल्क भोजन वितरण करण्यात आले.
       दीक्षाभूमी हे चंद्रपूर शहरातील आणि नागपूरच्या दीक्षाभूमीखालोखाल भारतातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख बौद्ध तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी आपल्या ३ लाखापेक्षा अधिक अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तत्पूर्वी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे १४ व १५ ऑक्टोबर १९५६ रोजी अनुक्रमे ५ लाख व २ लाख अशा एकूण ७ लाखावर अनुयायांनाही दीक्षा दिली होती. त्यामुळे या दोन्ही स्थळांना ‘दीक्षाभूमी’ म्हटले जाते
        वर्षभर बौद्ध अनुयायी येथे भेटी देत असतात, परंतु दरवर्षातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाला म्हणजेच १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध लोक येथे बुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, टिना उराडे, सारिका यशवंत उराडे, प्रशांत रामटेके आदी उपस्थित होते.