मंगळवार, १२ मार्च, २०२४

*मार्कंडा येथे यात्रेकरूंना तीन दिवस निःशुल्क भोजन वितरण*

    






















गडचिरोली 

- आदिवासी स्वायत्त परिषद तथा आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील पुरातन हेमाडपंती मंदिरातील परिसरात महाशिवरात्री निमित्त तिन दिवस निःशुल्क भोजन वितरण करण्यात आले. 

              चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे प्रसिद्ध पुरातन हेमाडपंती मंदिर आहे. विशेष म्हणजे, वैनगंगा नदी तिरावर हे मंदिर वसलेले असून दक्षिणवाहिनी वैनगंगा नदी मार्कंडेश्वर मंदिरापासून उत्तरवाहिनी झाली आहे. त्यामुळे, या मंदिराला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त जवळपास पंधरा दिवस येथे मोठी यात्रा भरत असते. मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. यात्रेदरम्यान लहान-मोठ्या दुकानांसह अनेक मनोरंजनाची साधने येथे लावली जातात. त्यामुळे, यात्रेकरूंची जेवणाची गैरसोय होत असते, करिता यात्रेदरम्यान भाविकांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी दहा वाजता पासून ते रात्रौ अकरा वाजता पर्यंत, अशी तीन दिवस हजारो यात्रेकरूंसाठी निःशुल्क भोजन वितरण व शुद्ध पाण्याची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली. 

               कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिवाकर पेंदाम, राहुल पेंढारकर, टिना उराडे, सुखदेव कंन्नाके, रामचंद्र कातंगे, रवी मसराम, गोवर्धन कुंभारे, प्रशांत भागात, माधव बोरकुटे आदि पदाधीकार्यांनी परिश्रम घेतला.

- नाटक हे मानवी जीवनावर लक्ष केंद्रित करून जीवनाचे प्रतिबिंब उमठवीत असतात : माजी जि.प. अजय कंकडालवार

 *यातना नाटकातून उमगल्या भटक्यांच्या यात

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली: 





































शहरी भागात विविध सामाजिक संस्था व क्रिडा मंडळांकडून नाट्यरसिकांचे मनोरंजनासाठी तसेच समाज प्रबोधन व समाज जागृतीसाठी भिन्न भिन्न नाट्यप्रयोगाचे आयोजन करीत असतात. याच धर्तीवर एटापल्ली येथे विर बाबुराव शेडमाके नाट्य कला मंडळ एटापल्ली यांच्या सौजन्याने राहुल पेंढारकर लिखित दिग्दर्शित मराठी नाटक 'यातना' या नाट्यप्रयोगाचे बंद शामियानात आयोजन करण्यात आले.

        प्रसंगी नाटकाचे उदघाटन जि.प. माजी अध्यक्ष, आविस व काँग्रेसचे नेते व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

      उदघाटक म्हणून उपस्थित नाट्यरसिकांना मार्गदर्शन करतांना अजय कंकडालवार म्हणाले, नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक, काल्पनिक व्यक्ती यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय आणि काव्यात्मकता म्हणजेच नाटक असून नाटकाचे अनेक प्रकार असून यात संगीत नाटकाला आजही अनन्य महत्व आहे, नाटक आणि ग्रामीण समाजाचा विकास हे एक कला प्रकार म्हणून मानवी जीवनावर लक्ष केंद्रित करून प्रतिबिंब उमठवीत असतात, असे बहुमूल्य मार्गदर्शन त्यांनी केले.

          नाटकाचे उदघाटन प्रसंगी पुढे बोलतांना कंकडालवार म्हणाले, नाटक हे एक जिवंत सांप्रदायिक कला असून त्यात नाटक हे झाडीपट्टी मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहेत. रंगमंचावर सादर करणाऱ्या नाटकातुन प्रत्येक नाट्यकलावंत हे अनेक पात्रांतून कथाकथनाचे कार्य करीत असतात.

       यावेळी आदिवासी काँग्रेस सेलचे जि. अध्यक्ष तसेच सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी, एटापल्ली सचिव प्रज्वल नागूलवार, एटापल्ली नगरपंचायतचे नगरसेवक नामदेव हेचमी, अविका सचिव प्रशांत टेकूलकार, शिवसेना तालुका प्रमुख मनिष दुर्गे, मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमस्वप्नील मडावी, श्रीकांत कोकुलवार, पुणेश कंदिकूरवार, परिसरातील आविसं- कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.