बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

*राहुल पेंढारकर यांना राज्यस्तरीय आदर्श कर्यगौरव पुरस्कार प्रदान..*



 मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुनीजन गौरव परिषद सोहळा नागपूर येथे मंगळवरी दु 2 वाजता पार पडला. ऍड. कृष्णाजी जगदाडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामांकित मानकरी गुनीजन गौरव परिषदेत उपस्थित होते. याप्रसंगी राहुल पेंढारकर ह्यांना राज्यस्तरीय गुनीजन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. लक्षवेधी गौरवपदक,विशेष महावस्त्र, खास मानपत्र, पुश्पहार व श्रीफळ अशा प्रकारे पुरस्काराचे स्वरूप होते. राहुल पेंढारकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यानी "आई जन्माची शिदोरी" , "शोधू कुठे किनारा" ह्या सामाज प्रबोधनात्म्क नाटकाचे लेखन केले आहे. "छब्बू  ताईची शाळा" या गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेवर आधारित ऑडियो सीडी मधे गीत लेखन व गायन केले तर "भ्रूण कन्येचा टाहो" ह्या कवीता संग्रहात त्यांची कवीता समाविष्ट करण्यात आली आहे. शिवाय विविध वर्तमान लेख प्रकाशित झाले आहेत. कलेचा वारसा जपत ते सामाजिक बांधिलकी सूद्धा जोपासत आहेत. जागृत युवा मंचच्या माध्यमातून ते यूवाकाना एकत्र करून  सामाजिक उपक्रम राबवत असतात. या कार्याची दखल घेता त्याना 2014 मधे कोल्हापूर येथे राज्यस्तरीय ड्रा बाबासाहेब आम्बेडकर जनमीत्र पुरस्कारानी गौरविण्यात आले होते. हा त्याना मिडालेला दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यामुडे त्यांचे सर्वत्र  कौतुक होत आहे. याप्रसंगी रुपेश गावडे, रवी गज्जल्वर, गीरीधर दलाई , विजय गड्डमवार जागृत युवा मंचचे सर्व सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: