शनिवार, २० मे, २०१७

🔹सार्वजनिक स्वच्छतेसाठी नगराध्यक्षाना निवेदन 🔹



देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी अनेक कार्यक्रम व उपक्रम देशात राबवून व्ययक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले आहे.त्याला संपुर्ण देशात चांगला प्रतिसाद मीळाला...पण याला अपवात ठरत आहे अहेरी शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे..स्थानीक विकास निधीतुन सार्वजनिकशौचालय, मुत्रीघर व स्थानगृह बांधण्यात आले.पण याचा उपयोग जणतेला न होता कचरा साठविण्यासाठी केला जात आहे.येथे टाकाऊ कचरा भरलेला आहे. डुकरे व अन्य जनावरे या ठीकाणी येत असल्याने येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याबीकडे नगरपंचायत प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.येथे स्वच्छतेची ऐसी तैसी झाली आहे. ...शौचालय,मुत्रीघर व स्थानगृह याची डागडुजी करुन येथील परीसर स्वच्छ करण्यात यवा तसेच शहराची लोकसंख्या विचारात घेथा  नवीन शौचालय बांधण्याथ यावे बाबतचे निवेदन जागृत युवा मंचाचे अध्यक्ष राहूल पेंढारकर,संतोष तलांडे,मारोती मडावी, सोनू तदांडे,विकास मुंजमकर, पोपटलाल कन्नाके यांनी नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार यांना दिले आहे...."आपण प्रत्यक्ष लक्ष घालुन येथील स्वच्छता करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. सध्या रोजगारासाठी मजूर हे बाहेर गावी गेले आहेत.त्यामुळे मजुराचा तुटवटा आहे. तरी सुद्धा नगरपंचायतीच्या नियमीत कर्मचारी यांचा उपयोग करुन या कामाला प्रथम प्राधान्य दिले जाईल.".असे आश्वासन नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार यांनी दिले.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: