शनिवार, २० मे, २०१७

*जागृत युवा मंचचा कृती कार्यक्रम*



स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे असे म्हणतात, पण स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षानंतर देखील आज खरच स्त्री ही स्वतंत्र आहे का, आजही स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतच आहेत. स्त्रीभ्रूणहत्येबरोबरच हुंडा ही प्रथा सुद्धा समाजाततील एक कीड आहे. सरकारने हुंडाप्रथेविरोधात कायदा अंमलात आणला पण अजूनही समाजात हुंडा ही प्रथा,परम्परा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कायम आहे. आज देशात दर एक तासाला हुंडाबळी होते. हूंडाबळीची ज्वलंत समच्या लक्षात घेऊन जागृत युवा मंच,अहेरी च्या वतीने कृती कार्यक्रम घेण्यात आला. त्यामधे पत्रके वाटून हूंडा प्रथेचा निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकाच्या माध्यमातून युवकांना हुंडाबंदी विषयी माहिती देण्यात आली. पत्रकात म्हटले आहे की, हुंडाप्रथेमुळे कित्येक वैवाहिकाना आर्थिक,मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. कित्येक स्त्रियांना वैवाहिक जीवनातुन बाहेर पडावे लागते. आजचा तरुण, युवा हा स्वतः आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. युवकानी स्वतः आपल्या बुद्धी प्रमेयाचा बढावर विचार करुन हूंडा प्रथेस विरोध करावयास पाहिजे. कारण जोपर्यंत हुंडाप्रथेप्रती युवकांच्या मानसीकतेत बदल घडून येणार नाही,तोपर्यंत समाज परिवर्तन होणार नाही. त्यासाठी युवकांनी रजिस्टर मेरेज, आंतरजातीय विवाह, वधू वर सूचक मंडळ यांना प्राधान्य द्यायला पाहिजे शिवाय शासनाने हूंडा प्रतिबंधक कायददा अधिक सक्त करून पोलीस प्रशासन विभागात विशेष अधिकारी नेमावयास पाहिजे. सदर कार्यक्रम नागेपल्ली येथे घेण्यात आला. कार्यक्राच्या यशस्वितेसाठी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर,सचिन खोब्रागडे, रवि दुर्गम,मंगेश सलामे,रवि गज्जलवार,पोचंना मूडमाडीगेला,मोहन जंगम,सुधाकर गूरूनूले,पवन सडमेक,अमित बावणे,दिनेश बूरम्वार,विजेंद्र शील,कु. रेखा डे,कु.प्रियंका मीटपल्लीवार, कु.शिवानी बिश्वास आदि जागृत युवा मंचच्या शिष्टमंडळाने सहकार्य केला.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: